अरुण नरके फौंडेशनची फौजदार(PSI) निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ

गुरुवार 31 मार्च 2022

वेळ : दुपारी 4 वा.

स्थळ : नरकेवाडी, अमृतधारा फार्म, कळंबा, कळंबा जेलजवळ, कोल्हापूर.

उपस्थिती : अध्यक्ष, विश्वस्त, गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, विद्यार्थी प्रेक्षक

प्रस्तावना :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१९ मध्ये घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या(PSI) परीक्षेत अरुण नरके फौंडेशनचे तब्बल १६ विद्यार्थी यशस्वी झाले, यामध्ये दिपाली रविंद्र कांबळे अनुसूचीत जाती महिला प्रवर्गातून राज्यात पहिली तर धनश्री विठ्ठल तोरस्कर या ओबीसी स्पोर्ट्स प्रवर्गातून राज्यात पाचव्या आल्या त्याचबरोबर प्रियांका सुरेश माने(OBC F-11), अभिजित श्रीकांत घोरपडे(OBC G-13), सुशांत शंकर उपाध्ये(OBC G-16), शंभू आनंदराव पाटील (OPEN G-17),रणजीत आकारम कांबळे(SC G-25), रोहित बाळासो जाधव(SC G-31), सारीका नारायण मरकड (OPEN F-35), विशाल रंगराव गडकर(SC G-40), शितल राजाराम पाटील (OPEN F-45), रविकुमार शिवाजी पाटील(OPEN G-80),हैदर शौकत संदे(OPEN G-86), युवराज जगन्नाथ जगताप (OPEN G-87), प्रकाश शामराव सादळे(OPEN G-89), कुलदीप सुरेश पोवार(OPEN G-111) असे सर्वजण संस्थेचे विद्यार्थी राज्यातील पहिल्या १११ क्रमांकाचे आत उत्तीर्ण झाले आहेत.

            या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचा गौरव 31 मार्च 2022 रोजी अमृतधारा फार्म, नरकेवाडी, कळंबा, कोल्हापूर येथे करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. चेतन अरुण नरके (वाणिज्य सल्लागार थायलंड सरकार) यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण नरके, विश्वस्त बाळ पाटणकर, रविंद्र उबेरॉय, अजय नरके, दिलीप नरके, खाजाणीस सौ स्निग्धा चेतन नरके, सौ लीना तुपे-नरके, सौ जयश्री नरके इत्यादी मान्यवर व  गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, विद्यार्थी प्रेक्षक उपस्थित होते.

       5 वा. कार्यक्रमाची सुरवात रोपाला पाणी घालून झाली. त्यानंतर गुणवंत विद्यार्थाचा मान्यवर मंडळीच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अरुण नरके फौंडेशनचे पोलीस उपनिरीक्षकपदाच्या(PSI) परीक्षेत तब्बल १८ यशस्वी विद्यार्थी व 2 सेंटर PSI विद्यार्थ्यांचा गौरव गिफ्ट, शाल,श्रीफळ, गुलाबपुष्प, फेटा देऊन करण्यात आला. तसेच मुलाखत कमिटी मधील API बनसोडे, API फाळके मॅडम, STI शशिकांत माने, फिजिकलचे सरदार सर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.  

            सर्व गुणवंत विद्यार्थ्यानी  यावेळी आपली मनोगते उस्पुर्तपणे व्यक्त केली. परीक्षेत यश मिळावे यासाठी प्रयत्नात सातत्य ठेवलेच पण त्याचबरोबर अरुण नरके फौडेशनमुळे आम्हाला अभ्यासातील बारकावे समजले, तसेच वेगवेगळ्या तज्ञ अधिकारी यांच्या समवेत घेतलेल्या डिजिटल मुलाखत सरावाचा खूप फायदा झाला, आमच्या यशात आमच्या प्रयत्नाइतकेच अरुण नरके फौंडेशन येथील शिक्षक, स्टाफचाही तितकाच वाटा असल्याची प्रतिक्रिया यशस्वी विद्यार्थांनी दिली.

त्त्यानंतर अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थेचा अध्यक्ष  मा. चेतन नरके म्हणाले  अशा प्रकारचे चित्र पूर्णपूणे बदलण्याची किमया करणारी पाउलवाट रूजवून घवघवीत यशाची परंपरा जोपासत करिअरच्या सर्वच क्षेत्रांत निकालामध्ये उत्तुंग शिखर सर करण्याचे काम अरुण नरके फौंडेशन गेली २७ वर्षे सातत्याने करीत आलेली आहे. संस्थेचे आजपर्यंत ४७५० हून अधिक विद्यार्थी शासकिय व बँकिंग सेवेत कार्यरत आहेत. हि यशाची परंपरा अशीच चालू राहील यात काही शंका नाही. यामध्ये बोलताना अरुण नरके फौंडेशन नवनवीन कोणकोणते कोर्सेस सुरु करत आहे त्याची माहित दिली त्याच प्रमाणे इच्छा असून हि पैशाआभावी ज्या मुलांना शिक्षण घेता येत नाही त्यांसाठी ५  लांखाची कै सुनिता नरके शिष्यवृत्ती योजनाची घोषणा करण्यात आली.

यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. व कार्यक्रमाची सांगता झाली.

सुत्रसंचलन शरद कांबळे सरानी व समारोप रमेश कांबळे यांनी केले.     

Read More

पुण्यात टॉप थाय बॅण्ड ट्रेड फेअर २०२२ चे आयोजन-थायलंड मधील ३४ उद्योजक होणार सहभागी!

मुंबई : डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन, थायलंड, आणि मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स रॉयल थाय गव्हर्नमेंट यांच्या वतीने आणि महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर च्या सहकार्याने हडपसर पुणे येथील लक्ष्मी लॉन येथे २५ ते २७ मार्च २०२२ असे तीन दिवस टॉप थाय बॅण्ड ट्रेड फेअर २०२२ चे आयोजन करण्यात येणार आहे. हेल्थ अॅण्ड ब्युटी, फूड अॅण्ड बेवरेज, फर्निचर आणि फॅशन या चार श्रेणीतील थायलंड मधील ३४ उद्योजक,उत्पादक , संस्था या मध्ये सहभागी होणार  असल्याची माहिती थायलंडच्या वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार चेतन अरुण नरके यांनी दिली आहेत. या पत्रकार परिषदेत थायलंडच्या कॉन्स्लेट जनरल सुपात्रा आणि  महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते.

दोन्ही देशांमधील उद्योजकांना संधी मिळणार :
याबाबत चेतन नरके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दाेन्ही देशातील व्यापारी संबंध वृद्धिंगत करणे, दोन्ही देशातील उद्योजकांमध्ये व्यापारी करार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये दोन्ही देशामधील उद्योजकाना उद्योग संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. यातून आर्थिक, बौद्धिक गुंतवणुकीसह रोजगार आणि उद्योगाच्या नवनवीन संधी निर्माण होणार आहेत. १९४७ मध्ये भारतासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारा थायलंड हा पहिला आशियाई देश होता. या दोन देशामधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दोन हजार  वर्षांहून अधिक जुने आहत धार्मिक आणि सांस्कृतिक समानतेमुळे मैत्रीचा पाया घट्ट होत सर्वच पातळीवरील संबंध खोलवर रुजले गेले आहेत.  
———————————————————-
व्यापार विषयक संबंध वृद्धिंगत होतील-
    चीन आणि अमेरिकेचे बिघडलेले व्यापारी संबंध आणि जागतिक पातळीवरील राजकीय घडामोडीचा फायदा थायलंड आणि भारताच्या एकत्रित आर्थिक विकासासाठी संधी निर्माण करणारा आहे. या सर्वाचा विचार करता या ट्रेड फेअर च्या माध्यमातून दोन्ही देशातील स्थानिक उद्योगांना आंतरराष्ट्रीय पातळीवर समान व्यासपीठ निर्माण होणार आहे. याकरिता लक्ष्मी लॉन येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहेत. या आयोजनासाठी लागणार सर्व खर्च डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन, थायलंडच्या वतीने करण्यात येणार आहे. आणि यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्यामध्ये प्रस्थापित व्यापार विषयक संबंध वृद्धिंगत होतील असा विश्वास  चेतन अरुण नरके यांनी  व्यक्त केला आहे.
————————————————
 कोरोनातही द्विपक्षीय व्यापार वाढ-
   जागतिक आरोग्य सुरक्षा निर्देशांकात यायलंड जगात सहावा आणि आशियात पहिला क्रमांक आहे. थायलंडच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात २१ टक्के वाटा हा पर्यटन क्षेत्राचा आहे. असे असले तरी थायलंड इतर अनेक उद्योगात अग्रेसर आहे. यामध्ये प्रामुख्याने शेती, कृषी प्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रिक उपकरणे, कॉम्प्युटरचे सुटे भाग, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा निर्मिती, वाहने, वाहतूक व्यवसाय, चित्रपट आणि करमणूक, कलात्मक वस्तू असे अनेक उद्योग थायलंडच्या राष्ट्रीय उत्पन्नात भर घालतात. भारत आणि थायलंड दरम्यान सध्यस्थितीत १२५ बिलियन डॉलर चा व्यवसाय होत आहे. भविष्यात या मध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. कोरोना  महामारीत आणि आर्थिक मंदीतही थायलंड आणि भारत या वर्षाच्या पहिल्या १० महिन्यात ५६ टक्के  द्विपक्षीय व्यापार वाढ झाली आहे ही खूपच सकारात्मक बाब असल्याची माहिती  थायलंडच्या कॉन्स्लेट जनरल सुपात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली

.

Read More

क्षितिजापार झेपावणाऱ्या पंखांना बळ देणारी प्रेरणा यशाची

अरुण नरके फौंडेशन आयोजित

संस्थापिका विश्वस्त कै. सौ. सुनिता अरुण नरके यांच्या स्मृतीदिन

दिनांक :-  02 मार्च 2022

वार     :-  बुधवार

स्थळ  :-  श्री. शाहू  स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर.

उपस्थिती  :-  अध्यक्ष मा. श्री. चेतन नरके, संस्थापक मा. श्री. अरुण नरके, खाजाणीस सौ. स्निग्धा नरके, विश्वस्त श्री. अजय नरके, श्री. दिलीपनरके,  माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, विश्वस्त श्री. रविंद्र उबेरॉय,  गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, अमरसिंह पाटील, अजित नरके, बाळासाहेब खाडे, एस. आर. पाटील, युथ बँक अधिकारी –कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्तावना :- अरुण नरके फौंडेशनच्या वतीने संस्थापिका कै. सौ. सुनिता अरुण नरके यांच्या स्मृतीदिन निमित्य गेली 2 दशके देशभरातील नामवंत वक्त्यांची व्याख्यानाचे आयोजन  केले जाते. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी माजी प्रधान सचिव महेश झगडे IAS यांचे ‘क्षितिजापार झेपावणाऱ्या पंखांना बळ देणारी प्रेरणा यशाची’  या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले गेले.

            कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी संस्थेचे संस्थापक मा. श्री. अरुण नरके, विश्वस्त मा. अजय नरके, मा. दिलीप नरके, माजी अध्यक्ष बाळ पाटणकर व विश्वस्त रविंद्र उबेरॉय यांच्या हस्ते विविध पदावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक :-अरुण नरके फौंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. चेतन अरुण नरके यांनी संस्थेविषयी व नवीन कोर्सेसविषयी माहिती विशद केली तसेच शिक्षणाबरोबर संस्थेचा संस्था करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.   

            त्यानंतर प्रथम मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना व उद्योजकता विकास केंद्राचे माजी प्रमुख सुनील देसाई यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपला प्लन ब विषयी म्हणजेच सरकारी उद्योग व स्वयंरोजगार योजनेविषयी महत्वपूर्ण अशी सविस्तर माहिती दिली.

            यानंतर मेन वक्ते राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे IAS  यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री चेतन नरके याच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी  विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वतःला प्रेरणा हवी असेल तर दुसऱ्यांचे प्रेरणास्त्रोत बना, तरच स्पर्धा परीक्षा असो वा जीवन यात यशस्वी व्हाल, असे प्रतिपादन केले.   

स्पर्धा परीक्षा असो वा जीवन अपयशानंतर नैराश्य येऊ नये याकरता प्लन बी कायम तयार ठेवावा, असाही सल्ला त्यांनी दिला.

            झगडे म्हणाले, स्पर्धा परीक्षांचा टीआरपी शासनातील लोकांनी वर नेला आहे त्यामुळे पालकांच्या आशा वाढल्या आहेत. यात अपयश आले तर विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जातो असे प्रतिपादन केले.

            कार्यक्रमाच्या शेवटी प्रतिवर्षाप्रमाणे कोल्हापूरचे जेष्ठ गायक मा. श्री. महेश हिरेमठ यांचे पसायदान गायन झाले.

निवेदन व आभार श्री. स्वप्नील पन्हाळकर यांनी केले   

Read More